Ad will apear here
Next
जयगड-बागवाडी अंगणवाडीत पूरक पोषण आहाराचे वाटप
जयगड : अंगणवाडीतील सहा महिने ते तीन वर्षे वयोगटांतील बालकांसाठी नावीन्यपूर्ण पूरक पोषण आहार या योजनेचा शुभारंभ रत्नागिरी तालुक्यातील जयगड-बागवाडी अंगणवाडी केंद्रात करण्यात आला. जयगडच्या ग्रामआरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध कमलाकर साळवी यांच्या हस्ते पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.

या वेळी बालकांसाठी गहू, मसूरडाळ, तूरडाळ, मटकी, मूगडाळ, मीठ, हळद, मिरची, खाद्यतेल आदी साहित्य बंद पिशव्यांतून वितरित करण्यात आले. या प्रसंगी ग्रामपंचायतीच्या सदस्या स्नेहा रवींद्र झगडे, माजी सदस्या प्रमिला अनंत झगडे, शिवसेना शाखाप्रमुख नारायण चंद्रकांत काताळकर, युवासेना कार्यकर्ते अथर्व अनिरुद्ध साळवी, अंगणवाडी सेविका वैष्णवी विश्वास पवार, अंगणवाडी ताई अपर्णा जयंत झगडे, शिवसैनिक रिंकेश मारुती झगडे आदी मान्यवर तसेच पालक उपस्थित होते.


या वेळी अनिरुद्ध साळवी यांनी या योजनेची माहिती उपस्थितांना दिली. अंगणवाडी सेविका पवार यांनी मुलांमधील लोह कमतरता दूर करणाऱ्या गोळ्या आणि सिरप आदी सुविधासुद्धा दर सोमवारी आणि गुरुवारी देण्यात येणार असल्याचे सांगून ही जबाबदारी ‘आशा’ आरोग्यसेविकांवर असून, याही योजनेचा लाभ बालकांना काळजीपूर्वक देण्याचे आवाहन पालकांना केले. मुलांची उंची आणि वजन यांची नोंद काळजीपूर्वक घेण्यासाठी शासनाने अंगणवाडीत उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. त्याचे प्रात्यक्षिक मान्यवरांसमोर करून दाखविण्यात आले.

मार्गदर्शन करताना अनिरुद्ध साळवी
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZQZCC
Similar Posts
जयगड सागरी पोलीस ठाण्यात ग्रामस्थांची सभा रत्नागिरी : तालुक्यातील जयगड सागरी पोलीस ठाण्यात जयगड परिसरातील प्रमुख ग्रामस्थांची सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या सभेत नवनियुक्त सहायक पोलीस निरीक्षक सुशांत वराळे यांनी मार्गदर्शन केले.
‘जेएसडब्ल्यू’तर्फे जयगड येथे शिक्षकांसाठी शिबिर जयगड : येथील जेएसडब्ल्यू पोर्ट लिमिटेडच्या सीएसआर विभागातर्फे मानस समुपदेशन, रत्नागिरीतील मानसोपचार व मूल्यमापन केंद्र आणि जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक शिक्षकांसाठी ‘वर्गाचे मानसिक स्वास्थ्य आणि शिक्षकांची भूमिका’ हे दोन दिवसीय निवासी शिबिर घेण्यात आले.
जयगडला नवरात्रौत्सवाचे आयोजन रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील नवतरुण मंडळातर्फे १० ते १५ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सकाळी सात वाजता पूजा, सायंकाळी ७.३० वाजता महाआरती, रात्री नऊ वाजता भजन आणि १० वाजता दांडिया असे कार्यक्रम होणार आहेत.
‘जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट’तर्फे जीवन कौशल्य कार्यशाळा रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जेएसडब्ल्यू जयगड पोर्टचे वरवडे येथील माध्यमिक विद्यालय, पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, मालगुंड येथील शिरीष मुरारी मयेकर विद्यालय, बळीराम परकर विद्यालय, चाफे येथील सुनील मुरारी मयेकर कनिष्ठ विद्यालय येथे जीवन कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. सोनाली कदम आणि माणिक बाबर यांनी मार्गदर्शन केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language